top of page

लॉकडाउन वाढीसंदर्भात 15 तारखेला निर्णय; आरोग्यमंत्री टोपे...


ree

#जालना- सध्या राज्यात प्रत्येक दिवसाला ५० ते ५५ हजारपर्यंत कोरोना रूग्ण संख्या येत आहे. त्यामुळे राज्याच्या लॉकडाउनमध्ये वाढ करायची की नाही यासंदर्भात (ता. १५) मे दरम्यान निर्णय घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी (ता.आठ) जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातील कोरोना रूग्ण दर काही प्रमाणात कमी झाला आहे.

विशेष करून राज्यातील ३६ जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. परंतु, इतर जिल्ह्यात कोरोना रूग्णांची वाढीचा दर कायम आहे. तर काही जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढ होत आहे, त्या जिल्ह्यांवर आरोग्य विभाग लक्ष ठेवून असून अशा जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्ण संख्या वाढत राहिली तर कडक लॉकडाउन लावावा लागेल. तसेच राज्याच्या एक तृतीयांश भागामध्ये कोरोना रूग्ण संख्याचा दर स्थिर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये वाढ करायची की नाही ? याचा निर्णय (ता. १५) मे दरम्यान घेण्यात येईल, असे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी म्हटले आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...

@महालाईव्ह न्यूज जालना

 
 
 

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page