top of page

'संविधानातून इंडिया शब्द हटणार यात चुकीचे काय'; संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया...


मोदी सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवले आहे. येत्या 18 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत हे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात विविध विधेयकं मांडली जाणार आहेत. यात राज्यघटनेत मोठा बदल करण्याचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती आहे. देशाच्या राज्यघटनेतील ‘इंडिया’ हा शब्द हटवला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार राज्यघटनेतून 'इंडिया' शब्द हद्दपार करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर संभाजीराजे छत्रपतींनी प्रतिक्रिया दिली. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचं नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणावरून एक मुद्दा सुचवला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला मागास म्हटले नाही. पहिल्यांदा मराठा समाजाला मागास ठरवायला हवे, असे ते म्हणाले.

1 Comment


संविधान मुळे सर्व काही सुरळीत व सुरक्षित आहे

Like

Weather

Frequently

Select Your Choice

विजय संकल्प सभा- मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सभा...
bottom of page