top of page

पंतप्रधान मोदींनी केली 'विश्वकर्मा योजना' जाहीर; योजनेचा नेमका फायदा कोणाला?


ree

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून विश्वकर्मा योजनेची घोषणा केली. भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केले.


आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात गरिबांपर्यंत पोहोचलेल्या सर्व योजनांचा उल्लेख केला. यावेळी मोदींनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली. येत्या काळात विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी 13-15 हजार कोटी रुपयांसह नवीन बळ देण्यासाठी विश्वकर्मा योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेद्वारे पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना सरकार मदत करेल. यामध्ये सोनार, लोहार, न्हावी, चर्मकार आदी पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांचा समावेश करून त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत केली जाईल.


15,000 कोटी रुपयांपासून सुरू होणारी ही योजना पुढील महिन्यापासून लागू केली जाईल. या अंतर्गत कारागीर आणि लहान व्यवसायांशी संबंधित लोकांना मदत केली जाईल. अर्थसंकल्पात या योजनेचा उल्लेख होता. योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, आधुनिक तंत्रांचे ज्ञान, हरित तंत्रज्ञान आणि ब्रँड प्रमोशन केले जाईल.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page